प्रतिनिधी : शेती पंपासाठी आवश्यक असणारी वीज रात्री अपरात्री उपलब्ध होते. रात्रीच्या वेळी शेतकर्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. यातून...
प्रतिनिधी : शेती पंपासाठी आवश्यक असणारी वीज रात्री अपरात्री उपलब्ध होते. रात्रीच्या वेळी शेतकर्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. यातून अनेक अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे शेती पंपाना दिवसा वीज मिळावी, ही मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत आहे. त्याच धर्तीवर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री व राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेती पंपाना दिवसा वीज देण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
राज्यातील ऊर्जा धोरणाविषयी मंत्री तनपुरे यांनी विधानभवनात अगदी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.
या शासन निर्णयामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक शेतकर्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
सौर उर्जा प्रकल्पांना चालना...
पर्यावरणाच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्पाला चालना देण्यासाठी महावितरणसह खासगी कंपन्यांना देखील त्या दृष्टीने जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सौर ऊर्जा योजनेवरील सबसिडीमध्ये वाढ करण्याची मागणी काही उपस्थित लोकप्रतिनिधीने ऊर्जा मंत्र्याकडे केली. जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विविध शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा प्राधान्याने वापर व्हावा. जेणे करून मोठ्या प्रमाणात विजेची बचत होऊ शकते. त्यादृष्टीने देखील प्रयत्न व्हावेत, अशी मागणी काही आमदारांनी केली. यासंबंधी ऊर्जामंत्री तनपुरे म्हणाले, अपारंपारिक ऊर्जा धोरणानुसार राज्यात विजेची बचत करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्न करत आहे. येत्या काळात सौर उर्जा प्रकल्पांना चालना दिली जाईल, असे ते म्हणाले.
राज्यकर्ता | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा https://www.rajyakarta.in/
| फेसबुक | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. ७७७३९१३४१ | ईमेल : rajyakarta111@gmail.com
COMMENTS