केंद्राने राज्य सरकारचे हक्काचा निधी रोखला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मांडणे कठीण होते. तरीही सामान्य घटकाला डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडल...
केंद्राने राज्य सरकारचे हक्काचा निधी रोखला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मांडणे कठीण होते. तरीही सामान्य घटकाला डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला आहे. महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. महिलांना मुद्रांक शुल्कात विशेष सवलत दिली आहे. शेतकर्यांमुळे अर्थकारण टिकून आहे. त्यामुळे शेतकरी टिकला पाहिजे, त्यांना दिलासा देण्यासाठी शून्य टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
सध्या देशात फसव्या विज्ञानाचा जाणीवपूर्वक प्रचार होत आहे. अशा परिस्थितीत भावी पिढीच्या मनात अभिजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक महसूल मुख्यालयाच्या परिसरात अत्याधुनिक अशा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्कची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे पवारांनी जाहीर केले.
COMMENTS