माध्यमांशी संवाद साधताना अॅाड. सरोदे यांच्यासह आर्किटेक्ट अर्शद शेख, सामाजिक कार्यकर्ते बहिरनाथ वाकळे व इतर. अहमदनगर : प्रतिनिधी प्रक्षोभ...
माध्यमांशी संवाद साधताना अॅाड. सरोदे यांच्यासह आर्किटेक्ट अर्शद शेख, सामाजिक कार्यकर्ते बहिरनाथ वाकळे व इतर. |
अहमदनगर : प्रतिनिधी
प्रक्षोभक द्वेषपूर्ण विधाने करुन धर्मा-धर्मात द्वेष पसरविणार्याण व जातीय तेढ निर्माण करणार्याा यती नरसिंहानंद सरस्वती (गझियाबाद, उत्तर प्रदेश) यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या खाजगी तक्रार अर्जावर गुरुवारी (दि.12 ऑगस्ट) अॅसड. असीम सरोदे यांनी अतिरीक्त मुख्य न्यायाधिश तेजस्विनी निराळे यांच्या कोर्टात युक्तिवाद केला. सामाजिक कार्यकर्ते बहिरनाथ वाकळे, आर्किटेक्ट अर्शद शेख व अनंत लोखंडे यांनी येथील न्यायालयात कलम 200 (फौजदरी प्रक्रीया संहिता) नुसार खाजगी तक्रार अर्ज दाखल करून भारतीय दंड विधानात 153 अ, 153 ब, 295 अ, 505 नुसार धर्मांध, द्वेषपूर्ण विधाने करून राष्ट्रीय एकात्मता दुषित करुन धर्माच्या आधारे तेढ निर्माण करणार्या3 यती नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण :
यती नरसिंहानंद सरस्वती हे सातत्याने व्हिडिओ व्हायरल करुन दोन धर्मात द्वेष निर्माण होईल अशा पध्दतीने गरळ ओकत आहे. त्यांनी देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन त्यांनाच देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न चालवला आहे. या संदर्भात तक्रारदारांनी तोफखाना पोलीस स्टेशनला नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशनला गेले होते. सदर प्रकरणी पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन घेतला नाही. तसेच याबाबत पोलीस अधिक्षकांना देखील निवेदन देण्यात आली. मात्र त्यांच्याकडून देखील कारवाई झालेली नाही. शेवटी जिल्हा न्यायालयात नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी खाजगी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर दि.26 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
अहमदनगर ही क्रांती करणारी भूमी : अॅरड. सरोदे
अॅमड. असीम सरोदे म्हणाले की, नरसिंहानंद सरस्वती यांचे कृत्य धर्मांधतेचे प्रतिक आहे. भारताच्या एकात्मतेला धक्का लावण्याचे काम ते करीत आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई झाल्यास कट्टरवादी धर्मांधांना लगाम लागणार आहे. विषारी जातीयवादी प्रवृत्ती नव्हे, तर विचारी जातीय एकात्मता जोपासण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर शहर हे क्रांतीचे शहर असून, अनेक क्रांतिकारक परिवर्तन करणारे लोक या शहराने दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर तोफखाना पोलीसांनी दखलपात्र गुन्हा असताना तक्रार दाखल करुन घेण्याची गरज होती. बाबा रामदेव यांच्या कोरोना औषध प्रकरणी देशातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. याप्रमाणे नरसिंहानंद यांच्यावर शहरात गुन्हे दाखल करुन घेण्याची गरज होती. पोलीस अधिक्षकांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता संबंधीत महाराजवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
याबाबत माध्यमांशी बोलतांना अर्शद शेख म्हणाले की, यती नरसिंहानंद सरस्वती प्रशोभक भाषण करुन देशातील जातीय द्वेष पसरवीत आहे. कोणताही धर्म माणसाला माणसापासून तोडत नाही. माणसा-माणसात भेद करणे हा खरा अधर्म आहे. भारताचे माजी राष्ट्रपती यांच्याबद्दल सर्व समाजात आदरभाव असताना त्यांना नरसिंहानंद देशद्रोही ठरवत आहे. इतकेच नव्हे तर देशातील संपुर्ण सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नर चिन्ह निर्माण करत आहे. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करुन द्वेष पसरवीत आहेत.
बहिरनाथ वाकळे यांनी भारतात समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाचा पुरस्कार करण्यात आला आहे. मात्र काही महाराज धर्माच्या नावाखाली देशाची शांतता भंग करण्याचे काम करत आहे. देशाची एकात्मता अखंडित ठेवण्यासाठी कायदेशीर पध्दतीने लढा देण्याचे काम करण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी अॅाड. सरोदे यांच्यासह अॅहड. अजित देशपांडे, अॅवड. अक्षय देसाई, अॅाड. फारुक बिलाल, अॅरड. शाकिब शेख, अॅकड. इरफान शेख यांनी काम पाहिले.
COMMENTS